मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा ! विधान परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या
मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे. यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.
Elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra will be conducted on May 21 in Mumbai: Election Commission of India (ECI) https://t.co/fWQZXcNola
— ANI (@ANI) May 1, 2020
राज्यात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने काही अटी-शर्तीसह परवानगी दिली असून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.
Election Commission of India (ECI) grants permission for holding elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra. The necessary guidelines will need to be ensured for safety against #COVID19 during the elections pic.twitter.com/teikSwVdyi
— ANI (@ANI) May 1, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे पर्यंत कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास कडून प्रयत्न सुरु होते. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दोनदा शिफारस करून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाही. तसेच त्यांची २७ मे पूर्वी निवडणूक होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्या अगोदर शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीचं पत्र दिलं. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृवत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याचे पत्र राजभवनावर येऊन दिले होते.
राज्यातील विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कालावधी २४ एप्रिल ला संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्येच या ९ रिक्त जागांसाठी निवडणूक होणार होत्या. मात्र कोरोना संसर्गाचा प्रसार सुरु असल्यामुळे केंद्रीय आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांना २७ मे पूर्वी विधिमंडळ सभागृहाचं सभासद होणे आवश्यक असल्याने, महाविकास आघाडीकडून ही निडवणूक लवकरात लवकर घ्यावी यासाठी राज्यपाल आणि केंद्रीय निडवणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होत.
कोणत्या जागांसाठी निवडणूक
२४ एप्रिल रोजी विधानपरिषदेचे ८ सदस्य निवृत्त झाले आहे. तर एक जागा २४ एप्रिल पूर्वीच रिक्त झाली. त्यामुळे विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी ३ सदस्य २४ एप्रिल रोजी निवृत्त झाले आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य निवृत्त झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे.