कोल्हापूर : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह तिच्या आठ वर्षांच्या मुलाचा दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव रेल्वे उड्डाणपुलावर घडला.
यामध्ये आशाराणी सागर म्हैशाळे (32) आणि त्यांचा मुलगा आयुष सागर म्हैशाळे (8) हे ठार आहे. तर आशाराणी यांचे पती सागर शिवाजी म्हैशाळे (37) व मुलगी अनुष्का (6, चौघेही रा. दर्गा चौक, मिरज) हे दोघे जखमी झाले आहेत.
सागर म्हैशाळे हे पत्नी आणि दोन मुलांसह दुचाकीने कोल्हापूर जिल्ह्यातील सासरवाडीकडे जात होते. त्याचदरम्यान, उचगाव उड्डाणपुलावर भरधाव येणाऱ्या ट्रकने म्हैशाळे यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मुलगा आयुष जागीच ठार झाला. तर पत्नी आशाराणी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
दरम्यान, सागर आणि त्यांची मुलगी अनुष्का हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.