एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath-khadse) यांनी बुधवारी भाजपला रामराम ( (bjp-quit) ठोकला. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश (ncp-join) करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. मी फक्त फडणवीस यांच्यावर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो फडणवीस यांनी दाखल करायला लावला,याचा मनस्ताप झाला असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान खडसे यांनी आपल्याला व्हिलन (khadse-made-me-villain) ठरवले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खडसे यांनी राजीनामा दिला हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठाकडे जायला हवे होते, असे फडणवीस म्हणाले. याचबरोबर खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्याच्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कोणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले आहे. भाजपा हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपासोबतच आहे, असे फडणवीस म्हणाले.

दिल्या घरी सुखी रहाः दानवे

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा खडसे यांचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पक्षात बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसे यांनी सोडायला नको होता. नाथाभाऊ बद्दल पक्षातील कुणाचाही मनात दुमत नाही. त्यांना पक्षांकडून नक्कीच उभारणी मिळाली असती. पण त्यासाठी काही काळ जाण महत्वाच असत. काही न्यायालयीन बाबीची पुतर्ता होणे गरजेचे होते. पण आता ते जिथे गेलेत, तिथे सुखी रहावे, असेही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) म्हणाले. तर दुसरीकडे वो जाने वाले हो सके तो लौट के आना, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांच्या प्रवेशावर दिली आहे.

खडसेंचा कधी होणार पक्ष प्रवेश

शुक्रवारी (दि. 23) मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.