मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालली आहे. मराठवाडा विदर्भ या भागात तर उष्णतेची तीव्र लाट आहे. अशा स्थितीत दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती. सोमवारी निवडणूक आयोगाने यावर निर्णय घेत महाराष्ट्रातील आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत दिली आहे. तसेच राज्य सरकारला दुष्काळात मदत कार्य करण्यास परवानगी दिली आहे.
Election Commission of India has given relaxation in Model Code of Conduct in Maharashtra and has allowed state govt to carry out drought relief work. pic.twitter.com/NZO1jtj50u
— ANI (@ANI) May 6, 2019
महाराष्ट्रातील ४८ जागांकरिता मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असल्यामुळे त्यावर उपाययोजना कारण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती .
मुख्यमंत्र्यांनी पाठवले पत्र
राज्यात तीव्र उन्हाळा आहे. दुष्काळाचा सामना करण्याकरिता अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहारी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कमळाची देखभाल अशी कामे उन्हाळ्यातच करावी लागतात. यातच राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ निवारणाकरिता केंद्र सरकारने ४७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक सुद्धा घेण्याची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.
राज्यातील २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
राज्यातील २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.
गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (११२)
सांगली (५) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव
सातारा (१) : माण-दहीवडी
सोलापूर (९) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
पालघर (३) : पालघर, तलासरी, विक्रमगड
धुळे (२) : धुळे, सिंदखेडे
जळगाव (१३) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल
नंदुरबार (३) : नंदुरबार, नवापूर, शहादा
नाशिक (४) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर
अहमदनगर (११) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड
औरंगाबाद (९) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड
बीड (११) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,
जालना (७) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर
नांदेड (२) : मुखेड, देगलूर
उस्मानाबाद (७) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम
परभणी (६) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू
हिंगोली (२) : हिंगोली, सेनगाव
अमरावती (१) : मोर्शी
बुलडाणा (७) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा
यवतमाळ (६) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव
चंद्रपूर (१) : चिमूर
नागपूर (२) : काटोल, कळमेश्वर
मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (३९)
पुणे (७) – आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी
सातारा (२) – कोरेगांव, फलटण
धुळे (१) – शिरपूर
नंदुरबार (१) – तळोदे
नाशिक (४) – देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड
नांदेड (१) – उमरी
हिंगोली (१) – कळमनुरी
लातूर (१) – शिरुर अनंतपाळ
अकोला (५) – बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला
अमरावती (४) – अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी
बुलडाणा (१) – मोताळा
वाशिम (१) – रिसोड
यवतमाळ (३) – केलापूर, मारेगांव, यवतमाळ
चंद्रपूर (४) – ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही
नागपूर (१) – नरखेड
वर्धा (२) – आष्टी, कारंजा