लखनऊ : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळेपत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र आता देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. तसंच निवडणूकांचे वेळापत्रक लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
निवडणुकांविषयी माहिती देताना त्यांनी ईव्हीएम मशीनवर टीका करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. आम्ही जाणते अजाणतेपणी इव्हीएमचा फुटबॉल बनवला आहे. निकाल मनासारखे लागले तर ईव्हीएम चांगल्या आणि निकाल विरोधात गेले तर इव्हीएम खराब असे आरोप केले जातात, असं म्हणत त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली.
दरम्यान, भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता निवडणूक आयुक्तांनी याबाबत चित्र स्पष्ट केले आहेत.