प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसवर विजेची तार कोसळली; बसेस जळून खाक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई-नागपूर महामार्गावर प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसवर विजेची तार पडली. विजेची तार कोसळून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तीन बसेस जळून खाक झाल्या. ही घटना मुंबई-नागपूर माहामार्गावर नशिराबादजवळ घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने या घटनेत एका बसला वाचवण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B01LY1QHL5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’91e6957b-7d0b-11e8-9c24-61f6facb1560′]

मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबादजवळ उभ्या असलेल्या बसेसवर ही तार कोसळली. शॉर्ट सर्किटझाल्यामुळे तीन बसेसला आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली.

दरम्यान, या घटनेमुळे मुंबई-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच प्रयत्न केला. बघ्यांनी गर्दी केल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. वाहतूक कोंडीमुळे इतर वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.