‘लॉकडाऊन’मध्ये ‘नागिन’ फेम सायंतनीला सतावतोय ‘घर-कार’चा EMI ! लग्नाबद्दल बोलताना दिलं ‘असं’ उत्तर

पोलिसनामा ऑनलाइन –नागिन 4 मालिकेत मान्यताची भूमिका साकारणारी सायंतनी घोष 2020 च्या एंडिंगमध्ये बॉयफ्रेंड अनुग्रहसोबत लग्न करणार होती. परंतु कोरोनामुळं आता त्यांच्या लग्नाला ब्रेक लागला आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं लग्नाचं प्लॅनिंग आणि लॉकडाऊनसह इतर अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

कधी करणार लग्न ?

लग्नाबद्दल बोलताना सायंतनी म्हणते, “कोरोना कधी पर्यंत चालेल ते माहिती नाही. आम्हाला सेटल व्हायचं आहे आधी तर आम्हाला हे पहावं लागेल की, सोशली काय पॉसिबल आहे ते. आता आम्ही दोन तीन महिने याचा विचार करू शकत नाही असं वाटत आहे. पाहूयात काय होते ते. कधी मन झालं तर करूयात व्हर्च्युअली लग्न. कधी रजिस्ट्री करून येऊ. तुम्हाला समजेलच.”

पुढे बोलताना सायंतनी म्हणते, “प्रत्येकाचं आयुष्यात आपापलं प्लॅनिंग असतं. फायनांशियल स्थिती पाहूनच करत असतो. नागिन 4 मधील माझी भूमिका आताच एवढ्यात संपली होती. परिस्थिती पाहता असं वाटत नाही की, शुटींग आता रिज्युम होईल. लॉकडाऊनच्या सुरूवातीला काही नव्हतं वाटलं जास्त. पण आता चिंता वाटत आहे. माझ्या घराचा आणि कारचा ईएमआय आहे. आता असंच सुरू राहिलं तर मी हप्ता कसा भरणार. यामुळं तर जास्त टेंशन येतं.

लॉकडाऊननं काय शिकवलं ?

सायंतनी म्हणते, “लॉकडाऊननं एकटं राहणं आणि स्वत:ची कंपनी एन्जॉय करणं शिकवलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून 5 कपडे घालत आहे फक्त. कपाट पाहिलं तर असं वाटतं किती पैसे आपण कपड्यांवर वाया घालवतो. शौक पूर्ण करा पण त्याची सवय होते त्याचं काय. लॉकडाऊननं आयुष्याला रिसेट बटण मिळालं आहे असं मला वाटतं.”