मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत जेव्हा लग्न केले तेव्हा तिचे वय २९ वर्षे होते. या जोडीला चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. परंतु सर्वांना हा प्रश्न पडला होता की, कमिटमेंट केली होती तर अखेर अनुष्काने लग्नाला घाई का केली. जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला याचे उत्तर मिळणार आहे. अनुष्काने नुकताच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
अनुष्का म्हणाली की, “आमचे प्रेक्षक इंडस्ट्रीपेक्षाही आमच्याशी जास्त जोडले गेले आहेत. प्रेक्षकांना कलाकारांना फक्त स्क्रिनवर पाहायचं असतं. त्यांना तुमच्या खासगी आयुष्याशी काही घेणं-देणं नसतं.
अनुष्का पुढे म्हणाली की, “त्यांना काहीच फरक पडत नाही की तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही किंवा तुम्ही आई बनल्या आहात किंवा नाही. आपल्याला या पूर्वाग्रहातून बाहेर पडण्याची गरज आहे. मी २९ व्या वर्षी लग्न केलं. एक अॅक्ट्रेस म्हणून हे वय कमी आहे. परंतु मी प्रेमात पडले होते. मी त्याच्यावर प्रेम करते. लग्न अशी गोष्ट आहे जी नात्याला पुढे नेते. मी नेहमी या बाजूने उभी राहिली आहे की, महिलांना समान वागणूक दिली जावी.”
अनु्ष्का म्हणाली की, “माझी अशी इच्छा नव्हती की, आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना माझ्या मनात भीती असावी. जर एका माणसाला लग्न करणे आणि त्यानंतर काम करण्यापासून भीती वाटत नसेल तर महिलांच्या बाबतीत असे का व्हायला नको ? बाकी अॅक्ट्रेसही असे करत आहेत हे पाहून आनंद होत आहे. जे प्रेम करत आहेत ते समोर येत आहेत. प्रेम व्यक्त करत आहेत.”
किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स
जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे
सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे
‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’
वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा
मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय
‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या
पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !