ठाकरे मंत्रिमंडळाकडून महत्वाचे 4 निर्णय, राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना मिळणार 1500 रूपये प्रवासभत्ता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था महाराष्ट्रात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आडाळी येथे 50 एकर जागा देण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा दीड हजार कायम प्रवासभत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय

1. इनाम किंवा वतन जमिनी ज्या भोगवाटादार वर्ग -2 च्या आहेत, त्यांची अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
2. दिवा रेल्वे स्टेशन येथील लेव्हल क्रॉसिंग वर पुल बांधणे व पुलाचे जोड रस्त्याकरीता मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता.
3. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 हजार रुपये कायम प्रवासभत्ता
4. राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था महाराष्ट्रात स्थापन करणार. आडाळी येथे 50 एकर जागा देणार.