अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रेचे आयोजन केले आहे. यादरम्यान नाना पटोले यांनी मुंख्यमंत्री कार्य़ालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात असल्याचा आरोप केला असताना त्यांनी शिवसेनवर देखील खळबळजनक आरोप केले आहेत. राज्य शासनाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या एसटी प्रवाशी विम्याचे दरदिवसाला 67 लाख रुपये मातोश्रीवर पोहचवले जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
परिवहन विभागाला प्रवासी दरदिवशी जो विम्याचा एक रुपया देतो, तीच रक्कम मातोश्रीवर पोचवली जाते. शेतकऱ्यांचा कैवार घेणारे दिवाकर रावते आता प्रवाशांची लूट करीत असल्याचा घणाघाती आरोप पटोले यांनी यात्रेदरम्यान केला आहे. सत्ताध्याऱ्यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रेचे आयोजन केले असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.
मुनगंटीवारांचा ‘डबल’ विकास
सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निषाणा साधताना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचा एक्सिस बँक आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून डबल विकास झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच महाजनादेश यात्रेद्वारे मुख्यमंत्री विकासकामांचा देखावा सादर करत असून महापर्दाफाश यात्रेच्या माध्यमातून याचा पर्दाफाश केला जाणार आहे.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या