कुलगाममध्ये चकमक, २ दहशतवादी ठार

जम्मू : वृत्तसंस्था – दक्षिण काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने भारतीय सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. तसेच संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

याबाबाबत सविस्तर वृत्त असे कि, बडग्राम येथील चाडूरा जवळच्या गोपालपोरा-कुलग्राम येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. तसेच दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत देखील एका दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले होते. त्याचबरोबर अनंतनागमध्ये देखील भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती.