उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या ‘या’ 3 दिग्गजांना स्थान नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अखेर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले आहे. आणि अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. कोणत्या नेत्याला कुठलं मंत्रीपद हे निश्चित झालं नसलं तरी यात अनेक नेत्यांना डावलण्यात आले आहे.

दरम्यान, युतीच्या काळात पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही

मागील मंत्रिमंडळात दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर दीपक केसरकर राज्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने यावेळी नवीन चेहऱ्यानं संधी दिली आहे. या व्यतिरिक्त शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तार आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना देखील आपल्या कोट्यातून मंत्रीपद दिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/