‘त्या’ UPSC उमेदवारांना मिळणार पुन्हा संधी ? सुप्रीम कोर्टात केंद्र सरकार म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱ्या विविधा स्पर्धा परीक्षांनाही कोरोनाचा फटका बसला होता. अनेक उमेदवारांना युपीएससीकडून घेतल्या जाणा-या परीक्षेला मुकावे लागले होते. अशा उमेदवारांनी पुन्हा संधी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या याचिकेवर ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार व युपीएससी आयोगाला सल्ला दिला. कोरोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. यावेळी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. कोरोनाचा फटका बसल्याने परीक्षा देता न आलेल्या परीक्षार्थींना पुन्हा एक संधी देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र आणि युपीएससीच्या विचाराधीन आहे, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.