स्वतःचा बचाव करण्यासाठी परमबीर सिंह यांच्याकडून खोटा आरोप – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहीले असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, अनिल देशमुख यांनी ट्विट करून सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याकडून 100 कोटी रूपयांचं टार्गेट दिलं होतं असा आरोप केला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं हे स्पष्टीकरण –
परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबरि सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना….