‘या’ खास कारणामुळं इरफान खानच्या ‘कबरी’वर कुटुंबीय लावणार ‘रातराणी’चं झाड !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खाननं बुधवारी (दि 29 एप्रिल) जगाचा निरोप घेतला. यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आणि कुटुंबाला यातून सावरण्यासाठी प्रार्थना केली. या सगळ्या नंतर आता इरफानची पत्नी सुतापा, मुलं बाबिल आणि आयान यांनी स्टेटमेंट जारी केलं आहे. यात चाहत्यांनी केलेल्या सपोर्टसोबतच इरफानच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. सुतापानं एक पोस्ट सोशलवर शेअर केली आहे.

सुतापां शेअर केलल्या या स्टेटमेंटध्ये म्हटलं आहे की, “मी कसं स्वत:ला एकटं मानू जेव्हा पूर्ण दुनिया माझ्या सोबत आहे. कोट्यावधी लोक दु:ख व्यक्त करत आहेत. मला सर्वांना सांगायचं आहे की, हे नुकसानं नाही तर हे मिळवणं आहे. गोष्टी मिळवणं आहे ज्या आपल्याला शिकवल्या गेल्या आहेत. आता याच गोष्टींवर अमल करण्याची वेळ आहे.”

सुतापानं डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इरफाननं तिला कठिण काळात खुश रहायला आणि अडचणींना धैर्यानं सामना करायला शिकावलं आहे. सुतापानं असं म्हटलं आहे की, “त्यांच्या(पती इरफान खान) या विजयाच्या प्रवासानंतर आम्ही त्यांना जिथे दफन केलं आहे तिथं आता आम्ही रातराणीचं झाडं लावणार आहोत. हे त्यांचं आवडतं होतं. हे वेळ घेईल परंतु एक दिवस फुलेल आणि याचा सुगंध त्यांचे चाहते आणि कुटुंबापर्यंत नक्की पोहोचेल.”

आपल्या स्टेटमेंटमध्ये सुतापा यांनी लहिलं की, “जेव्हा मी माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांकडून दिलेली शिकवण सांगायला सांगितली तेव्हा बाबिल म्हणाला, अनिश्चिततेच्या नृत्यापुढे नतमस्तक होणं शिका आणि ब्रम्हांडावर भरोसा ठेवा. आयान म्हणाला, आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. याला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.”