‘शाहीन बाग’ सारखं इंडिया गेटवर ‘करणी सेना’ बसल्यास परिणाम अत्यंत ‘वाईट’ होईल : सूरजपाल अम्मू

नवीदिल्ल्ली : वृत्तसंस्था – शाहीन बाग बाबत भाजप प्रवक्ता आणि करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अम्मू म्हणाले की, दिल्ली पोलीस जर अयशस्वी ठरत असेल तर करणी सेना उत्तर देण्यासाठी तयार आहे. ते म्हणाले आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही मात्र गेलो तर त्याला सोडत नाही. जर आम्ही तोडफोड सुरु केली तर तोंड फोडू असा इशारा देखील अम्मू यांनी यावेळी दिला.

अम्मू म्हणाले की, देशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. 25 कोटी मुस्लिमांनी हिंदूंना हलके घेऊ नका. ते म्हणाले की जर करणी सेना शाहिन बागेप्रमाणे इंडिया गेटवर बसली तर त्याचे दुष्परिणाम वाईट होतील. करणी सेना अशा लोकांना धडा शिकवेल.

हिंदूंशी घेऊ नका पंगा
अम्मू ने म्हंटले की, 110 कोटी हिंदूंशी कोणीही पंगा घेऊ नका तसेच यावेळी त्यांनी शरजील इमाम आणि कन्हैया कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला. अम्मू ने सांगितले की, या लोकांना देशात दंगल करायची आहे. मात्र अशा लोकांचे तोंड फोडू आणि त्यांना धडा शिकवू अशा शब्दात अम्मू यांनी इशारा दिला.

काँग्रेसला करायचे आहे देशाचे विभाजन
हिंदुत्वाच्या ठेकेदारांना काही मजबुरी असेल परंतु करणी सेनेची कोणतीही मजबुरी नाही. अम्मू म्हणाले की, हिंदूंनी काही बांगड्या घातलेल्या नाहीत तसेच राहुल गांधी हे काय गांधी नाहीत आणि काँग्रेसला धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करायचे आहे असे स्पष्ट मत अम्मू यांनी यावेळी व्यक्त केले.