‘शेतकर्‍यांना शाहीन बागसारखी वागणूक देऊ नका’ – राकेश टिकैत

दिल्ली : वृत्त संस्था – नव्या कृषी कायद्याविरोधात अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अद्यापही दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे परत घेण्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना बसून आहेत. आतापर्यंत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाल्या. परंतु त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्यावर ठाम आहेत.

दरम्यान, “सरकारनं शेतकरी आंदोलनाला शाहीन बागसारखी वागणूक देऊ नये. जसं की गेल्या वर्षी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये विरोधादरम्यान करण्यात आलं होतं,” असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले. “नवे कृषी कायदे जेव्हा मागे घेतले जातील तेव्हाच आंदोलक आपल्या घरी जातील. आंदोलक शेतकरी हे कोरोनाच्या नियमांचं पालन करतील आणि गरज भासल्यास हे आंदोलन २०२३ पर्यंतही जारी राहिल,” असं टिकैत म्हणाले. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना केवळ नुकसानच होईल, असा दावाही टिकैत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. एमएसपीवर कायदा होईपर्यंत थांबणार

“जरी लॉकडाऊन लागलं तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालि”जो पर्यंत हे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत आणि एमएसपीवर कायदा तयार केला जात नाही तोवर आंदोलक शेतकरी आपलं आंदोलन स्थगित करणार नाहीत. सर्व शेतकरी सीमेवर बसून राहतील. सरकारनं कोणत्याही चुकीच्या समजूतीत राहू नये आणि त्यांचं आदोलन दीर्घ कलावधीसाठी चालणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. न कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत,” असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.