नैराश्येतून गोताणे गावात तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील गोताणे गावात राहते घरात शेतकरी शरद तुकाराम पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर माहिती अशी की, गोताणे गावात शरद पाटील यांची शेती आहे. त्यांनी शेतात कांदा पिक पिकवले होते. कांद्याला पुरेसा भाव मिळत नाही. शेतात पिकाला द्यायला पाणी नाही. स्वतः जवळील मिळकतीतील शिल्लक कमी झाली. इतरांचे पैस कसे देणार या चिंतेने ते ञस्त झाले होते. यामुळे नैराशेतूनच त्यांनी राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी गावातील नागरीकांत चर्चा पसरली होती.

या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.