विना ‘अटी’ व ‘शर्थी’ची कर्जमाफी ! मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणातील ‘हे’ 29 महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीची मोठी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधीमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गंत 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे.

सरकार स्थापनेनंतर राज्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आले होते, त्यानंतर अखेर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची घोषणा केली, यावेळी विविध उपक्रम आणि योजनांची माहिती उद्धव ठाकरेंकडून आजच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देण्यात आली.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा निषेध केला आहे. फडणवीसांनी सवाल केला की, सरकाराने सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता, सात बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता त्याचे काय? सरकारचा आम्ही निषेध करत आहोत असे म्हणत भाजपकडून सभात्याग करण्यात आला. परंतु 2015 पासूनच्या थकीत कर्जाची जबाबदारी आमच्या सरकारने घेतली आहे, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाचे पैसे जाणार आहेत असेही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी आज मांडलेले मुद्दे –

1. मी विदर्भाचा नातू, आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचे.

2. विदर्भाच्या विकासात कोणताही कसूर ठेवणार नाही.

3. पंतप्रधान मोदीजी हे फक्त भाजपाचे नाही, देशाचे पंतप्रधान ते जागतिक नेते.

4. पंतप्रधान मोदी मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात, मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत.

5. गोरगरीबांसाठी 10 रुपयांत शिवभोजन योजना सुरु करणार आहोत. प्रायोगिक तत्वावर ही योजना 50 ठिकाणी सुरु करणार.

6. देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं नाही, असं मी कुठेही म्हटलं नाही.

7. वर्तमानपत्राचा दाखला देऊन विदर्भाचा विकास झालेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

8. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नाही.

9. सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.

10. प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. हे कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल.

11. सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही.

12. गोसी खुर्द प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही.

13. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार.

14. कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.

15. समुद्धि महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल.

16. व्याजापोटी अडीच हजार कोटी वाचवले.

17. आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

18. अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार.

19. पाच लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.

20. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे 200 रुपये देणार

21. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार.

22. पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

23. आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

24. अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार.

25. मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

26. विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढवणार.

27. लोणार सरोवराचं सौंदर्य संमोहित करुन सोडणार आहे.

28. जून 2023 पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार.

29. पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/