मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारच असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन मोठं विधान केलं. औरंगाबदमध्ये ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “जागतिक मंदी आणि देशात बंदी आहे म्हणून आपण रडायचं नाही. आपल्या राज्याला रडायचा नाही तर लढायचा इतिहास आहे. कृषी आणि उद्योग खातं एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करणार आहे. लहानपणी आपल्या मेड इन युस वगैरे अशा परदेशी बनावटीच्या वस्तूंचं आकर्षण असायचं. परंतु हे आकर्षण संपलं आहे. आता जगाला मेड इन इंडियाची भुरळ पडली पाहिजे.” असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गॅस पेटवणं सोपं आहे. परंतु घराघरात चूल पेटली पाहिजे. मी उद्योजकांना बोललो आहे की, कामगार टिकवणारे केंद्र आपल्याला हवे आहेत. उद्योग येतात. यांत्रिकीकरण होत आहे. परंतु सगळीकडे यंत्र असेल तर बाकी लोक पोट भरणार कसे. मी उद्योजकांना म्हटलो आहे की, तुम्ही उद्योग घेऊन या. परंतु भूमिपुत्रांना रोजीरोटी देण्याची जबाबदारी तुमची आहे.” असंही त्यांनी सांगितलं.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली
- दाढी करण्यासाठी ‘रेझर’ वापरताय? ‘या’ 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका !
- मुलांना कोणतं खेळणं देताय ? होऊ शकतात ‘हे’ 6 गंभीर धोके !
- ‘अॅस्प्रिन’ने टळू शकत नाही ‘हार्ट अटॅक’चा धोका ! हे आहेत 4 धोके
- ‘टीबी’ ची ही 6 कारणे जाणून घेतली तर टाळता येणे सहज शक्य, जाणून घ्या
- काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे
- मुलांना होणारा क्षय ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या
- मुलांना ‘पॅरासिटामोल’ देताय ? तारुण्यात होईल अस्थमा ! ‘हे’ आहेत 6 धोके
- दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा