श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी ३७० कलम हटविण्याच्या निर्णयावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या कलम ३७० कलमाच्या निर्णया विरोधात आपण कोर्टात जाऊ. आम्ही दगड किंवा ग्रेनेड टाकणार नाही. ते आमची हत्या करू इच्छितात. आम्हाला शांततेवर विश्वास आहे आणि आम्ही आमची लढाई शांततेत लढू. फारूक अब्दुल्ला, त्यांच्या निवासस्थानाबाहेरील पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
https://twitter.com/ANI/
फारुख अब्दुल्ला असेही म्हणाले की, माझा मुलगा ओमर अब्दुल्लाला फार वेदना होत आहे. तसेच अब्दुल्ला यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्ला चढविला. अब्दुल्ला म्हणाले, फारूक अब्दुल्ला अटकेत नसून ते स्वत: च्या इच्छेनुसार स्वत: च्या घरात आहेत असे गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे ऐकून मला फार वाईट वाटले. हे खरे नाही. अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ए ची भारत सरकारकडून हमी देण्यात आली होती. येथे मला माझ्या घरात तुरुंगवास भोगावा लागत आहे. आम्ही ७० वर्षे लढा देत आहोत आणि आज आम्ही दोषी ठरलो आहोत.
https://twitter.com/ANI/
- पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे
- थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
- ‘अपेंडिक्स’ आजाराचे असू शकतात ‘हे’ ८ संकेत, याकडे करु नका दुर्लक्ष
- ‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा
- काही मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा ‘हे’ ११ सोपे उपाय
- जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा
- शरीराच्या ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत