वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर वाढणाऱ्या वजनावर मिळवा ‘या’ पद्धतीने नियंत्रण

पोलिसनामा ऑनलाईन टीम : जस जसे वय वाढत जाते तस तसे अनेक आजार होऊ लागतात. त्यात आधुनिक जीवनशैलीमुळे मनावर येणारा तणाव शरीरासाठी घातक ठरू शकतो. याचाच परिणाम म्हणून वजन वाढणे हा एक त्रास निर्माण होतो. वजन वाढले की थकवा, रक्तदाब, मधुमेह, न्यूनगंड असे अनेक त्रास चालू होतात. विशिष्ट वयानंतर वजन वाढीवर नियंत्रण करण्यासाठी जाणून घ्या काही उपाय

पनीर
जस जसे वय वाढत जाते तस तसे स्नायू कमजोर होत असतात. याचा परिणाम पचन प्रक्रियेवर होतो. व्हे- प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू मजबूत होतात. यामुळे वजनही नियनयंत्रित राहते.

खरबूज
खरबूज मध्ये केवळ ४५ टक्के कॅलरी असते. आणि खरबूज ताजेपणासाठी चांगले फळ मानले जाते. आरोग्यासाठी खरबूज लाभदायी ठरतो.

काळे सोयाबीन
काळे सोयाबीन खाल्याने चरबी वेगाने कमी होते आणि वजनही नियंत्रित राहते. काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचे कर्करोग होण्याची शक्यता ही कमी होते.

पत्ताकोबी
पालेभाज्या आपल्या शरीरासाठी उत्तम असतात. त्यांच्या सेवनाने शरीरातील १० टक्के कॅलरी कमी करता येते. जर तुम्ही नियमित २ कप कोबीच्या पानांचा रस पिल्यास ११३ टक्के अधिक मात्रेत व्हिटॅमिन – ए मिळते.

अक्रोड
वजन कमी कारण्यासाठी अक्रोड खूप लाभदायी असते. अक्रोडमधील प्रोटीन फायदेमंद असते.