रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावरील कुवारबाव येथे यु टर्न घेणाऱ्या ट्रकवर रिक्षा आदळून झालेल्या अपघातात प्रवासी पितापुत्रांचा मृत्यु झाला. संतोष जानू बावदाने आणि श्रेयस संतोष बावदाने (रा़ रत्नागिरी) अशी या रिक्षा प्रवाशांची नावे आहेत. या अपघातात रिक्षाचालक संजय धोंडू आखाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजता घडला.
रिक्षाचालक संजय आखाडे हे रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन जात होते. कोल्हापूर येथून मिरजोळे एमआयडीसी येथे एक ट्रक जात होता. कांचन हॉटेल चौकातून ट्रक एमआयडीसीकडे वळत होता. त्यावेळी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रिक्षाने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात रिक्षातील तेरा वर्षाच्या श्रेयससह त्याचे वडिल संतोष बावदाने यांचा जागीच मृत्यु झाला. रिक्षामध्ये अडकलेल्या चालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय