नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री, मुख्य राजनीतीकार, त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारचे पहिल्या पर्वातील मुख्य संकटमोचक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे नवी दिल्ली येथील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक दिग्गज खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला मिळाले आहेत. त्यामुळे नवी दिल्ली येथील फोरज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय आज (मंगळवार) घेण्यात आला आहे.
News Alert: Kotla to be renamed as Arun Jaitley Stadium.
The renaming of Delhi's famous cricket venue as Arun Jaitley Stadium will take place on September 12 at a function where a Stand of the ground will be named after India captain Virat Kohli.— DDCA (@delhi_cricket) August 27, 2019
जेटली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष आणि दिल्ली असोसिएशनचे अध्यक्ष होते. १२ सप्टेंबरला एका सोहळ्यात कोटला स्टेडियमचे नामांतर करण्याचा निर्णय दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. यापूर्वी स्टेडियममधील एका स्टँडला टीम इंडीचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देण्यात आले आहे.
May he remain in our hearts forever. As a mark of respect to our beloved leader, I hereby propose to rename “Yamuna Sports Complex” as “Arun Jaitley Sports Complex” #RiPJaitleySir pic.twitter.com/ooK95RZHiQ
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 26, 2019
दिल्ली जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यासारखे खेळाडू घडले आहेत. भारताचा माजी सलामीवीर गंभीरने यमूना स्पोर्स्टस कॉम्प्लेक्सचे नाव बदलून अरुण जेटली स्पोर्स्टस कॉम्प्लेक्स करावे अशी मागणी केली आहे.
जेटली यांच्याकडून सेहवागची मनधरणी
विरेंद्र सेहवाग दिल्ली क्रिकेट कडून खेळत होता. मात्र, अंतर्गत राजकारणाचा त्याला फटका बसला होता. त्यामुळे त्याने दिल्ली क्रिकेट संघाकडून खेळण्यास नकार देत संघाला अलविदा देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावेळी अरुण जेटली यांना हे समजले त्यावेळी त्यांनी सेहवागशी संपर्क साधला. त्याच्याबरोबर बाचतचीत करून त्याची मनधरणी केली. अखेर सेहवागने हरियाणा संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या