PMC बँकेचे दुसर्या बँकेत विलीनिकरण होण्याची शक्यता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेचा 4355 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयकडून बँकेच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता शनिवारी राम अरोडा या पाचव्या खातेदाराचा मुलूंड भागात मृत्यू झाला. दक्षिण मुंबईमध्ये आरबीआय मुख्यालयाच्या बाहेर पीएमसी बँक खातेधारकांनी विरोध प्रदर्शन केले होते. ज्यात एका वृद्ध महिला आणि पुरुषांची तब्येत बिघडली. हे खातेधारक बँकेतील त्यांची जमा रक्कम परत देण्याची मागणी घेऊन आंदोलन करत होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्य सरकार एखाद्या दुसऱ्या बँकेत या बँकेचे विलीनिकरण करण्याचा प्रयत्न करेल.
मुलूंडच्या एक वृद्ध राम अरोडा या पीएमसी बँकेच्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे. त्यांचा शनिवारी घरी मृत्यू झाला, नातेवाइकांनी सांगितले आहे की हा नैसर्गिक मृत्यू आहे. राम अरोडा बँकेतील जमा रक्कमेवर निर्भर नव्हते. याआधी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात तिघे आजारी होते त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान बँकेतून पैसे काढता न आल्याने त्यांनी जीव सोडला, तर एका महिलेने आत्महत्या केली.
वृद्ध महिलेची आणि पुरुषांची तब्येत खराब
दक्षिण मुंबईतील आरबीआय मुख्यालयाच्या समोर सकाळी 11.45 वाजता 100 बँक खातेदारांना पीएमसी बँक आणि आरबीआयच्या विरोधात आंदोलन केले. यात महिलांचा देखील समावेश होता. यावेळी आरबीआयच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली. यावेळी अचानक एका वृद्ध महिला आणि पुरुषाची तब्येत खराब झाली.
पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शांतता ठेवण्यासाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले होते. कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही, 4355 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेच्या व्यवहारावर रोख लावले आहेत. पहिल्यांदा बँकेतून रक्कम काढण्याची मर्यादा 1 हजार रुपये होती, त्यानंतर ती 10 हजार रुपये आणि आता 40 हजार रुपये करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की खातेदारांच्या ठेवी पूर्णता सुरक्षित आहेत. सरकार या बँकेला रिव्हायव्हल करु शकत नाही. हे काम फक्त आरबीआय करु शकते. सरकार केवळ विलीनिकरणात सहयोग करु शकते. यासंबंधित मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. विधानसभा निवडणूकीनंतर या संबंधित निर्णय घेण्यात येईल.
Visit : Policenama.com
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या