शिवसेनेचा CM योगी यांच्यावर घणाघात, म्हणाले – ‘मुंबईतलं ओरबाडून लखनौ-नोएडात सोन्याचा धूर काढणार का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौरा करत राज्य सरकार युपीमध्ये जागतिक दर्जाची सिनेसृष्टी उभारणार असल्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, काही दिवसांपासून मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु झालीच होती. मुख्यमंत्री योगींनी याबाबत अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाल्याचेही सांगितला .

दरम्यान, शिवसेनेने आज सामानाचा अग्रलेखातून याच पार्श्वभूमीवर सामनामधून योगींसह भाजप पक्षावर निशाणा साधत ‘मिर्झापूर-3, फिल्म सिटी नक्की कोणासाठी?’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे. महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. ‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत.

नक्की काय म्हणाले सामनातून…
योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योग धंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाउन काळात हीच मंडळी मुंबईवर टीका करत होती. आता त्यात मुंबईत आले आहेत. मुंबईच वैभवच तसं आहे . आज संपूर्ण देश भिकेला लागलेला आहे; पण मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेले आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगीमहाराजलखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार? त्याऐवजी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये पण हे द्वारकाधीश मुंबईत सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्यांचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि सुदाम्याचे संपूर्ण नगरी सोन्याची करून टाकली, अशा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते हे पाहायला हवे. गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीचे रोटी खाता आहेत. हे आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले याचा विचार योगी महाराजांनी करावा. फिल्म सिटी हवीत पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगी च्या संकल्पित महानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही.

उत्तर प्रदेश मोठे राज्य असून ते फक्त लोकसंख्येने फुगले आहे. जातीयता धर्मांधता त्यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेच प्रश्न देशाला भेडसावत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आली. या सर्व श्रमिकांचे बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनऊ, कानपूर, मिरज शहरातील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करिअर करण्यासाठी वर्षानुवर्ष मुंबईत येत आहेत. योगी सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरल्यावर व त्यांनी फिल्मसिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवीन फिल्मसिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगला आहे.

येथील खरीखुरी मायानगरी ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय ? उत्तर प्रदेशला सोन्याने मडवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांत देखील आहे. हैदराबादेत आहे, तामिळनाडू, आंध्रात आहे. योगीमहाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीचे कार्य पुढे नेणार आहेत का काय? उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचं जळजळीत चित्र मिर्झापूर १ व २ या वेब सिरीजमध्ये आहे. आता मिर्झापूर ३ ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदच आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्याचे यावर काय मत आहे? की मुंबईला पीओके म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत असलेल्या योगींना ही त्यांचा पाठिंबा आहे? एका नटीन मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजप यांची प्यारी बहना झाली. भाजपच्या त्या नटीन पीओके म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात. हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या पीओके ची कायदा व सुव्यवस्था मिर्झापूर पेक्षा वेगळी नाही उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा. कायदा-सुव्यवस्था माय नगरी आपोआप निर्माण होईल असे म्हटले आहे.