नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिलायन्स समूहाच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या निर्णयाची देशभरात खिल्ली उडविली जात आहे. आता केंद्रीय अर्थ खात्यानेही त्यास तीव्र आक्षेप घेतला असल्याचे उघड झाले आहे. अद्याप अस्तित्वात न आलेल्या संस्थेला सर्वोत्तम संस्था म्हणणे हे तर्कविसंगत असून शैक्षणिक क्षेत्रासाठीही ते हानीकारक आहे, असे मत अर्थ खात्याने नोंदविले असून या निर्णयाला विरोध केला होता.
[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce469cfe-ab44-11e8-b860-e9d41da7d2ed’]
जुलै महिन्यात भारतातील सहा सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादी मनुष्यबळ विकास खात्याने जाहीर केली होती. या संस्थांना केंद्राकडून शेकडो कोटींची मदत मिळणार आहे. अजून अस्तित्वात न आलेल्या आणि केवळ कागदावर असलेल्या जिओ इन्स्टिट्यूटची यासाठी वर्णी लागल्याने संपूर्ण देशात या निर्णयावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाची दररोज खिल्ली उडविली जात आहे. या निवडीचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी समर्थन केले होते.