खुशखबर ! वाहन कर्ज, गृहकर्ज होणार ‘स्वस्त’, ‘बँका’ देणार मोठ्या प्रमाणात ‘कर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याचा थेट फायदा सामान्य ग्राहकांना, व्यवसायांना होणार आहे. परदेशी गुंतवणूकदार आणि देशातील गुंतवणूकदार यांच्यावर लागणारा उपकर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय सीएसआर कायदा शिथिल करुन त्याचे उल्लघंन करणे आता गुन्हा मानण्यात येणार नाही.

सामान्य लोकांना फायदा –
RBI कडून व्याजदरात कपात करण्यात आल्याचा फायदा ग्राहकांना देण्यावर सर्व बँकांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच इतर कर्जावरील EMI कमी केले आहेत. सरकारी बँक कर्ज पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांच्या आत ग्राहकांना कागदपत्रे देण्यात येतील. आता सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन असतील. लोन अप्लिकेशनची ऑनलाइन ट्रॅकिंग होईल.

व्यवसायांना फायदा –
स्टार्ट अप आणि त्यातील गुंतवणूकदारांसाठी असलेला एंजेल टॅक्स प्रोविशनला रद्द करण्यात आले आहे. तसेच बँकांना 70 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जेणे करुन ते जास्तीत जास्त कर्ज देऊ शकतील.

व्यवसाय करणे होणार सोपे –
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ईज ऑफ डूइंग अंतर्गत व्यवसाय प्रकरणांना 48 तासात निपटवण्यात येतील. एमएसएमई आणि घर खरेदी करणाऱ्यांना मजबूत आयबीसी आणण्यात आला.

GST फायलिंग करणे होणार सोपे –
अर्थ मंत्र्यांनी सांगितले की, GST रिटर्न आणि रिफंड करणे सोपे होणार आहे. सरकार लवकरच GSTN मधील दोषांना दूर करेल.

आरोग्यविषयक वृत्त –