नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकरानं भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लगाम लावायला सुरुवात केली आहे. जेणेकरून जनतेला अडचणींचा सामना करावा लागू नये. बँकेतून 1 लाखांहून जास्त कर्ज देताना होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कठोर कारवाई केली आहे. 2015 ते 2017 दरम्यान 10000 बँक कर्चमचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात नोटबंदीचा कालावधीही समाविष्ट आहे जेव्हा बँकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला होता. खासदार अन्नपूर्णा देवी आणि रमा देवी यांच्या प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी लोकसभेत हे उत्तर दिलं. त्यांनी असंही सांगितलं की, बँकेतील फ्रॉड रोखण्यासाठी सरकारनं दोन वर्षांत एकूण 3.38 लाख बँक खाती बंद केली आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
खासदार अन्नपूर्णा देवी आणि रमा देवी यांनी विचारलं होतं की, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज देताना जो भ्रष्टाचार होतो त्यावर एखाद्या अधिकाऱ्यावर काही कारवाई केली आहे का ? यावर उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “भारत रिझर्व बँकेकडून उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2015 मध्ये 4641, 2016 साली 3232 आणि 2017 मध्ये 2107 बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. हे कर्मचारी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्तीच्या रकमेत झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी होते.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या 6 महिन्यात सुमारे 95760 कोटी रुपयांची बँक फ्रॉडची प्रकरणं समोर आली आहेत. एप्रिल-सप्टेंबरमध्ये एकूण 5743 फ्रॉड संदर्भातील प्रकरणांची नोंद झाली आहे. बँकेतील फ्रॉड थांबवण्यासाठी सरकारनं मोठी पावलं टाकली आहेत. यात गेल्या 2 आर्थिक वर्षांत 3.38 लाख बँक खाती बंद करण्यात आली आहेत.”
Visit : Policenama.com
- ‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे
- सतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा
- हिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा
- योगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी
- ‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे
- गुलाबी थंडीत असे सांभाळा तुमचे आरोग्य, ‘हे’ 7 पदार्थ आवश्य सेवन करा
- वजन घटवण्यासाठी ‘या’ 7 टिप्स, केवळ दररोज चालण्याने जळतील 500 कॅलरीज !