मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – साकीनाका येथील खैरानी रोडवरील औद्योगिक गाळ्याला शुक्रवारी सायंकाळी लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, साकीनाका येथे केमिकलचे गाळे, लाकडाचे कारखाने दाटीवाटीने असल्याने ही आग क्षणात भडकली आणि जवळच असलेल्या झोपड्यांपर्यंत पसरली.
#UPDATE Mumbai Fire Brigade: Bodies of one male & one female, who had gone missing in the fire, recovered. One other person still missing. Search operation underway. https://t.co/gb17mHsgFK
— ANI (@ANI) December 28, 2019
या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 30 ते 35 गोदामे जळून खाक झाली आहेत. आरती लालजी जयस्वाल (वय-२५), पीयूष पिताडिया (वय-४२) अशी मृतांची नावे आहेत. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना आढळून आले. एक जण बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
लेव्हल फोरची ही आग असल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. विझवण्यासाठी ११ गाड्या, १२ वॉटर टॅंकर, फ्यूम टेंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आग पसरून नये म्हणून सतत पाण्याचा मारा सुरू आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- 8 तासांपेक्षा जास्त झोप घेता ? ‘या’ 4 प्रकारे जीवाला होऊ शकतो धोका !
- ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश केला तर वाढेल स्मरणशक्ती !
- ‘अॅसिडिटी’मुळे आहात हैराण ? करा ‘हे’ 4 घरगुती उपाय
- चुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात !
- उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ ९ उपाय करा ! जाणून घ्या
- हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी
- सावधान ! पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरल्यास होतात ‘हे’ 4 धोके