नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद मधील आग्रा लखनऊ एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये बस घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या मध्ये चौदा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जखमी प्रवाश्यांपैकी सात जणांना व्हॅटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ही घटना इतकी भयानक होती की बसची हालत खूपच खराब झाली होती त्यामुळे बसला क्रेनच्या साहाय्याने ओढून बाहेर काढावे लागले.
कंटेनरमध्ये घुसलेली बस दिल्लीहून लखनऊला चालली होती. दुर्घटना होताच आसपासच्या लोकांनी लगेच घटनास्थळी गर्दी केली ताबडतोब उपचार यंत्रणांना पाचारण करण्यात आले. बसमधील प्रवाशी वाईट परिस्थितीमध्ये अडकले होते. त्यातील 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटना इतकी वाईट होती की,मृतांची ओळख देखील पटणे कठीण होते. त्यातच लहान मुलांच्या ओरड्याने वातावरण एकदम बदलून गेले होते.
Dr Vishwa Deepak, Medical Officer, Emergency Ward of Saifai Mini PGI: At least 31 injured patients have been admitted to the hospital and 13 were brought dead. https://t.co/EEO9CCGH2w pic.twitter.com/VU4Ly0gW4r
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 12, 2020
आजूबाजूच्या लोकांनी केली मदत
बस कंटेनरमध्ये घुसल्याने मोठा आवाज झाला त्यानंतर सुरु झालेल्या आरडाओरडमुळे वातावरणात मोठा गोधळ उडाला. बसमध्ये अडकलेले लोक मदतीसाठी आरडाओरड करत होते.
सामानाची परवा नव्हती लोकांना
जखमी झाल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या सामानाची चिंताही नव्हती. जेव्हा त्याला बाहेर काढले जात होते, तेव्हा आम्हाला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहचवा असे सगळ्यांचे मत होते.
डीएमने तत्काळ व्यवस्था केली
दुर्घटनेची माहिती मिळताच डीएम चंद्र विजय सिंह यांनी तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात सर्व प्रवाश्यांच्या उपचाराची सोय केली. रुग्णवाहिका जशी रुग्णालयात पोहचेल तसे लगेच उपचार सुरु करण्याचे आदेश त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिले. रुग्णवाहिका देखील घटनास्थळी मोठ्या गतीने काम करत होत्या.