एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न 

रायगड: पोलीसनामा ऑनलाईन 

दिल्ली येथे एकाच कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे देशभर खळबळ माजली होती. ही घटना  ताजी असतानाच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी गावातील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bab83dcc-7f83-11e8-8a1b-49c89abc6ff1′]

या व्यक्तींनी शीतपेयात विष मिसळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून विष प्रश्न केलेल्या सर्वांवर अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबातील सर्वाना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या कुटुंबातील सर्वांची प्रकृती गंभीर आहे.