धक्कादायक ! भाच्याने केली मामा, मामी व त्यांच्या 3 मुलांची हत्या

अयोध्या : एका कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा प्रकार अयोध्यातील इनायतनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आला आहे. कुटुंबातील संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे. यात पती, पत्नी आणि २ मुले व एक मुलगी यांचा समावेश आहे. भाच्याने मामा, मामी व त्यांच्या तीन मुलांचा खुन केल्याचा सांगण्यात येत आहे.

राकेश कहार, ज्योती आणि त्यांचे ४, ६ व ८ वर्ष अशा तीन मुलांची हत्या करण्यात आली आहे. त्यांचा भाचा पवन हा फरार झाला आहे. दोन्ही परिवार जवळपास रहातात. वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तींवरुन त्यांच्यात वाद सुरु होता. पवन याने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धारदार हत्याने पाचही जणांवर वार करुन त्यांची हत्या केली व त्यानंतर तो पळून गेला आहे. याप्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पवन याचा शोध घेण्यात येत आहे़.