कालच्या गोंधळानंतर औरंगाबाद जि.प. वर ‘महाविकास’आघाडीचा झेंडा, मिना शेळके अध्यक्षपदी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काल गोंधळ झाल्यानंतर आज औरंगाबाद जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महाविकासआघाडीने आपला झेंडा फडकवला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मिना शेळके यांचा विजय झाला आहे तर उपाध्यपदी शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी काजे यांची निवड झाली आहे. यामुळे भाजपची औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून पिछेहाट झाली.

काल औरंगबाद जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. वैधानिक पेच निर्माण झाल्याने ही निवडणूक आज दुपारी 2 वाजता पुन्हा होणार होती. जि. प औरंगाबादच्या या निवडणूकीत काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फुटल्याचे सांगितले जात होते. काल निवडणूकीचे मतदान झाले. या दरम्यान सभागृहात एकूण 58 सदस्य उपस्थित होते, मतदानावेळी एका सदस्याने हात वर करुन पाठिंबा दर्शवला मात्र स्वाक्षरी केली नाही, त्यामुळे वैधानिक पेच निर्माण झाला आणि हा गोंधळ उडाला होता.

भाजपच्या जिल्हाधक्षांकडून सांगण्यात आले की शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी पाटील दोनगावकर यांना 29 मत पडली तर आघाडीच्या उमेदवाराला 28 मते पडली, आघाडीचा आक्षेप असा आहे की सदस्याने त्यांना मतदान देण्यासाठी हात वर केला परंतु त्या मतदार सदस्याने स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे बंडखोर उमेदवार दोनगावकर यांना 29 मते मिळाली. त्यानंतर दोनगावकर यांना अध्यक्ष म्हणून जाहीर करावे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. परंतु आज पुन्हा निवडणूक पार पडल्यानंतर महाविकासआघाडीने जिल्हा परिषदेवर विजयाचा झेंडा फडकवला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/