Coronavirus : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्रासह 10 राज्यात घरोघरी ‘सर्वेक्षण’

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनघरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे.

दहा राज्यातील 38 जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध 45 महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत काल  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी , ‘लॉकडाउन शिथिल केल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह 10 राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करावं. कंटेन्मेंट झोनमध्ये केसेसचं व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.’ महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या 10 राज्यातील 38 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.