लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची कारवाई !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर कठोर निर्बंध लागू केले. पुन्हा चोवीस तास उलटत नाही तोच अजून एका बँकेवर निर्बंध घातले आहे. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बँकेला काही सूचना करण्यात आल्या असून, बँकेवर लादण्यात आलेले निबंध हे १७ नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यापासून पुढचे सहा महिने लागू राहणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेवर महिनाभराच्या कालावधीसाठी अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी नवी मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार १६ डिसेंबर पर्यंत बँकेचे ग्राहक २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम सतत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या शिफारशीनंतर सरकारने हे पाऊल उचलले. अर्थ मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी आरबीआयनं, येस बँक आणि पीएमसी बँकसंदर्भातही अशाच प्रकारे निर्णय घेतले होते. परिणामी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार, आता मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कुठलेही कर्ज किंवा उधारी देता येणार नाही तसेच जुन्या कर्ज नाणी किंवा कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही तसेच बँकेवर नव्याने ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच बँकेला कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्याचा करता येणार नाही. मात्र, रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू करण्यामागचं कारण सांगितलेलं नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेला पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक पीएमसीमधी अफरातफरीची चाहूल लागली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. तसेच बँकेला संकटातून वाचविण्यासाठी आरबीआयने सप्टेंबर २०१९ रोजी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घातली होती.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी विलास बँकेवर एक महिन्याचा मोरेटोरियम लावण्यात आला होता. १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीसाठी मोरेटोरियम लागू करण्यात आला आहे. आरबीआयने अधिनियम कलम ४५ च्या अंतर्गत हा आदेश लागू केला आहे. पीसीए थ्रेसहोल्ड उल्लंघनाची दखल घेऊन आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेला सप्टेंबर २०१९ मध्ये फ्रॉम करे टीव्ही ॲक्शन प्राॅम्पट करेक्टिव एॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत बँकेला तीन ३९६. ९९ कोटी रुपयांचा तोटा झाला. बँकेच्या एकूण एनपीएच्या (बुडीत खात्यात गेलेलं कर्ज) तुलनेत हा २४. ५टक्के इतका आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या या तिमाहीत बँकेला३५७. १७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.