मराठवाड्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन

नांदेड जिल्ह्यामध्ये रविवार पासून संततधार पाऊस सुरु असून विष्णुपुरी प्रकल्पाचा रात्री उघडण्यात आलेला दरवाजा बंद करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस म्हणजेच मंगळवार (दि.२१) आणि बुधवारी (दि.२२) अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
[amazon_link asins=’B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’410c8a12-a480-11e8-8897-2398a717c2af’]

हवामान विभागाने मंगळवारी नांदेडसह बीड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर बुधवारी जालना, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या या  इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सर्व विभागाना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. आणखी पाऊस झाल्यास पूर तसेच अन्य आपत्तीचा धोका संभावित आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच राहण्याचे आदेश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी सांगितले.