…म्हणून अर्जुन-मलायकाच्या लग्नाला होतोय उशीर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे लग्न म्हणजे चर्चेचा विषय बनत आहे. लग्नाच्या विषयामुळे दोघेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी असे समोर आले होते की ते दोघे १९ ते २२ एप्रिल दरम्यान लग्न करतील. परंतु मलायकाने हे सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. काही कारणामुळे दोघांच्या लग्नाला उशीर होत आहे. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही लग्न करणार आहेत. पंरतु त्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे.

समोर आलेल्या वृ्त्तांनुसार, अर्जुन-मलायकाच्या लग्नाला उशीर होण्याचे कारण म्हणजे अर्जुनचं सतत शुटींगमध्ये बिजी असणं आहे. सध्या अर्जुन कपूर त्याचा आगामी सिनेमा पानीपतमध्ये बिजी आहे. सध्या अर्जुन कपूर आपल्या प्रोफेशनल कमेंट्स पूर्ण करणार आणि नंतरच आपल्या लग्नावर फोकस करणार आहे.

दरम्यान २४ मे रोजी अर्जुन कपूरचा सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेड रिलीज होणार आहे. त्यानंतर अर्जुन कपूर आपल्या लग्नावर लक्ष केंद्रीत करणार आहे. असे समजत आहे की, दोघेही गोव्यात लग्न करणार आहेत. दोघेही ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहे. मलायकाने अरबाज खानसोबतही चर्च वेडिंग केलं होतं. १९९८ मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.