देवबंद (उत्तर प्रदेश) – मोटारसायकलवरुन जाणा या भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष चौधरी यशपाल सिंह यांची हल्लेखोरांनी पाठलाग करुन हत्या केली. चौधरी यशपाल हे भाजपाच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली होती. भाजपाच्या अनेक वरिष्ठपदावरही त्यांनी काम केले.
वीटभट्टीचा व्यवसाय असणारे चौधरी यशपाल मंगळवारी आपल्या मोटारसायकलवरुन मिरगपूर येथून जात होते. तेव्हा दोघे हल्लेखोर त्यांचा पाठलाग करुन लागले. पण, त्यांना गाठता येत नसल्याने हल्लेखोरांपैकी एकाने गोळीबार केला. ती गोळी त्यांच्या पाठीला लागून ते मोटारसायकलवरुन खाली पडले. त्यानंतर हल्लेखोर त्यांच्याजवळ जाऊन पुन्हा खाली पडलेल्या चौधरींवर आणखी गोळ्या झाडल्या.
ते रस्त्यावरच रक्त्याच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.चौधरी यशपाल यांचे गावातील काही जणांशी २००७ पासून वाद सुरु होता. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर