अहमदनगर : शेततळयात बुडून 4 भावंडांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   श्रीगोंदा येथील गावात मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे हातावर पोट भरणाऱ्या ऊस कामगारांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावातील उसाच्या गुऱ्हाळावर कामाला होते. त्यांची मुले मंगळवारी दुपारी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यामध्ये चार भावांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनस्थळावर धाव घेत, नागरिकांच्या मदतीने चारही भावडांचे मृतदेह शेततळ्यातून काढले. मृत मुलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. तसेच मुले तळ्यात पोहण्यासाठी गेली असावीत. तळ्यातील प्लास्टिकच्या कागदामुळे ती घसरून पडली असावीत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे बाबुर्डी गावावर शोककळा पसरली आहे.

धबधब्यावरुन घसरुन तिघांचा मृत्यू

धुळे शहरालगत असलेल्या लळींग कुराणातील धबधब्या जवळ सेल्फी घेण्याच्या नादात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धबधब्या समोर फोटो काढत असताना एका तरुणाचा पाय घसरला. त्या पाठोपाठ इतर दोन तरुणही पाण्यात बुडाले. घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केल्यावर झालेला प्रकार समोर आला. यावेळी बचाव कार्यासाठी SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आलं होत. या तरुणांना बाहेर न पडता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.