टायर फुटल्याने तवेरा पाण्यात बुडून ४ जणींचा मृत्यु

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – देवदर्शनावरुन परत जात असताना भाविकांवर काळाचा घाला पडला. तवेरा गाडीचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेडे डोहातील पाण्यात बुडाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यु झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे.

हा अपघात कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील पन्हाळा रोडवर ज्योतिबा फाटा येथे शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला. यातील सर्व जण मिरज येथील मालगाव रोडवरील दत्त मंदिर कॉलनीतील रहिवासी आहेत. तांदळे कुटुंबीय गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन घराकडे परत येत होते. त्यावेळी पहाटे २ च्या सुमारास चालकाचा ताबा सुटला व कार रस्त्यालगत असलेल्या रेडे डोहात बुडाली.

या अपघातात मृत झालेल्याची नावे  :-
अश्विनी सुनील तांदळे (वय २६ वर्ष)
अनिषा सुनील तांदळे (वय १४ वर्ष)
धनश्री शशिकांत माने (वय ७ वर्ष)
जान्हवी सुनील तांदळे (वय ७ वर्ष)

जखमी :- आदर्श नितीन तांदळे ( वय ५ वर्ष) आणि ओम सुनील तांदळे (वय ३ वर्ष) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

दूध लिटर मागे ५ रुपयांनी महागणार ?