हरिद्वार (उत्तराखंड) : जेष्ठ पर्यावरणवादी प्रोफेसर जी.डी अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांचं उपोषणादरम्यान निधन झालं आहे. गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी गेल्या 111 दिवसांपासून ते उपोषण करत होते.यादरम्यान पाण्यात मध मिसळून केवळ त्याचे सेवत ते करत होते. पोलिसांनी उपोषणस्थळावरुन उचलल्यानंतर त्यांनी जलत्याग केला होता. हरिद्वारमधील ऋषीकेशच्या एम्स रुग्णालयात प्रा. अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’163964b5-cd5e-11e8-9f26-7b398fad889a’]
स्वामी सानंद कानपूर आयआयटी मध्ये प्राध्यापक होते. त्यानंतर केंद्रिय पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. सध्या एका सन्याशाचे जीवन ते जगत होते.
[amazon_link asins=’B076D7QK9B,B075JLZ1GF,B01MY4H1RY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2506c30f-cd5e-11e8-847e-bb6204282f08′]
अवैध रेती उपसा, बंधारे, बेसुमार प्रदूषण या जोखाडातून गंगेला मुक्त करावे, या मागणीसाठी स्वामी सानंद उपोषणाला बसले होते. ‘गंगा बचाव’साठी विविध मुद्द्यांवर स्वामी सानंद यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा बनवण्याची मागणी केली होती. त्या पत्रावर कोणतंही उत्तर न मिळाल्याने स्वामी सानंद २२ जूनपासून उपोषणाला बसले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी स्वामी सानंद यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांनी ती विनंती धुडकावली होती.
स्वामी सानंद यांनी २०१२ मध्येही गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी उपोषण केले होते. नंतर सरकारने मागण्या मान्य केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते.
स्वच्छ गंगेसाठी गेल्या १११ दिवसांपासून हरिद्वारमध्ये उपोषणावर असलेल्या प्रा. जी डी अग्रवाल यांचं आज निधन झालंय. २२ जूनपासून म्हणजे जवळपास गेल्या चार महिन्यांपासून ते उपोषणावर होते. कालच त्यांची प्रकृती बिघडायला लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना ऋषिकेशच्या एम्स हाँस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण अग्रवाल यांनी अन्नत्यागानंतर, जलत्यागही सुरु केला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत जाऊन हाँस्पिटलमध्येच त्यांचा मृत्यू झालाय.
[amazon_link asins=’B072SPDWTM,B01N7KRKW2,B078WZVDG9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11ecf868-cd5f-11e8-98a8-a35d25a9809b’]
केंद्र सरकारनं स्वच्छ गंगेसाठी गंगा कायदा लागू करावा, गंगेच्या काठावर कुठलाही जलविद्युत प्रकल्प उभारला जाऊ नये या आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. स्वच्छ गंगेसाठी भाषणं अनेक होतात, पण त्यासाठी आपले प्राण वेचण्याची तयारी जी डी अग्रवाल यांनी उपोषणाला बसतानाचा दाखवली होती. धक्कादायक म्हणजे इतके दिवस उपोषण सुरु असताना एकही केंद्रीय मंत्री त्यांना भेटायला गेला नव्हता. अविरल गंगेसंदर्भात काल केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढून यात जी डी अग्रवाल यांच्या बऱ्याच मागण्यांचा समावेश असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या उपोषणाचं काय याबद्दल मात्र फारसं कुणी बोलायला तयार नव्हतं.
आयआयटी रुरकी मधून त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं, त्यानंतर पर्यावरण अभियांत्रिकीमध्येही शिक्षण, कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी
[amazon_link asins=’B07DR84SM5,B074J7N6M2,B0725K5MTJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25d17019-cd5f-11e8-9047-f7e206008f12′]