केवळ 48 तासात 30 हजार जनावरांचा दिला ‘बळी’, जगभरात ‘या’ मंदिराची चर्चा
काठमांडू : वृत्तसंस्था – दक्षिण नेपाळमधील खेड्यात असलेल्या गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी भरणारी जत्रा सुरु झाली आहे. या जत्रेत हजारो प्राण्यांचा बळी दिला जातो. या वेळीही 30 हजार प्राण्यांचा बळी देण्यात आला आहे. केवळ दोन दिवस चाललेल्या या जत्रेनंतर गढीमाई जगातील सर्वात मोठे कत्तलखाना बनले.
काठमांडूपासून 100 किमी अंतरावर बैरियापूरमध्ये असलेल्या गढ़ीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी जनावरांची कत्तल केली जाते. हा उत्सव शक्तिची देवी गढीमाई देवीच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो. नेपाळ तसेच भारतातील लाखो लोक यात सहभागी होतात. यावेळी हा उत्सव मंगळवार आणि बुधवारी साजरा करण्यात आला.
प्राणी हक्क कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही प्राण्यांची कत्तल करण्यात आली. प्राणी हक्क कार्यकर्तेही येथे पशुबळीविरोधात आवाज उठवत आहेत. याशिवाय सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात सूचनाही बजावल्या आहेत, परंतु या सर्वांकडे दुर्लक्ष केले जाते. 2009 नंतर, मंदिर संचालकांवर जनावरांचा बळी देण्याच्या प्रथेवर बंदी घालण्याचे दबाव वाढत आहे. पाच वर्षात होणारा हा उत्सव जगातील एकमेव असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने प्राण्यांचा बळी दिला जातो.
- नियमित खजूर खाल्ल्याने होतात ‘हे’ ११ आरोग्य फायदे, जाणून घ्या
- तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट
- नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या
- तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या
- सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय
- ‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे
- संत्र्यापेक्षा सरस आहे शिमला मिरची ! ‘हे’ आहेत ७ आश्यर्चकारक फायदे