नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. मंगळवारी गौतम गंभीरने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याबरोबरच त्याने प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. त्याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Returning Officer accepts BJP candidate Gautam Gambhir's nomination for the East Delhi parliamentary constituency. AAP and Congress had raised objections over his nomination affidavit. (file pic) pic.twitter.com/R8DVqNqVud
— ANI (@ANI) April 24, 2019
क्रिकेटच्या मैदानावर कर्तृत्व गाजवणारा भारताचा माजि सलामीवीर गौतम गंभीर आता राजकिय मैदानात उतरला आहे. भाजप पक्षात त्याने प्रवेश केला असून त्याला पूर्व दिल्लीतून उमेदवारी देखील देण्यात आली आहे. त्याने नुकताच आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने आपल्या स्थावर आणि जंगम संपत्तीची माहिती दिली. एकूण १,४७,००,००,००० रुपयांच्या संपत्तीचा तो मालक असल्याचे समोर आले आहे. सध्या गंभीरने जोरदार प्रचार देखील करायला सुरुवात केली आहे.
२०१७- १८ च्या प्राप्तिकर परतावात गांभीरने त्याचे उत्पन्न १२. ४० कोटी असल्याचे जाहीर केले आहे. तर त्याची पत्नी नताशा हिच्या प्राप्तिकर परतावात ६.१५ लाखाचे उत्पन्न दाखवण्यात आले आहे. गंभीरने जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून १४७ कोटीची संपत्ती असल्याचे म्हंटले आहे. गौतम गंभीरच्या घरी ५ चारचाकी गाड्या तर एक दुचाकी गाडी असल्याचे त्याने नमूद केले आहे. विशेष म्हणजे गंभीरने जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तो दिल्लीतील सर्वाना श्रीमंत उमेदवार ठरला आहे.