‘या’ योजनेत तुम्हाला मिळतील 6 हजार रुपये, 1 सप्टेंबरपासून ‘इथं’ करा अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?
नवी दिल्ली : Government Schemes|भारतातील बहुतांश ग्रामीण भागातील नागरिक कृषी मजूरीवर अवलंबून असतात. छत्तीसगड सरकारने राजीव गांधी ग्रामीण भूमिहीन कृषी मजूर न्याय योजना (Rajiv Gandhi Gramin Bhumihin Krishi Majdur Nyay Yojana) सुरू केली आहे. या योजनेतून जवळपास 10 लाखापेक्षा जास्त भूमिहीन कृषी मजूरांना लाभ होईल. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.(Government Schemes)
या योजनेच्या माध्यमातून कृषी मजूरांना आर्थिक मदत प्रदान केली जाते. चालू आर्थिक वर्ष 2021-22 पासून सुरू होणार्या या योजनेंतर्गत नोंदणी आणि अर्ज करण्याचे काम सुरू होणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…
काय आहे योजना?
Rajiv Gandhi Gramin Bhumihin Krishi Majdur Nyay Yojana योजनेंतर्गत भूमिहीन कृषी मजूर कुटुंबांना प्रति वर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची ही आर्थिक रक्कम कुटुंब प्रमुखाला प्रदान केली जाते. वेबसाइटवर योजनेसाठी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी. यासाठी संबंधित ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकाकडे अर्ज करावा.
कोण करू शकतात अर्ज?
मुळ छत्तीसगढचे रहिवाशी मजूर अर्ज करू शकतात. अर्जदाराकडे कोणतीही जमीन नसावी.
मजूरीवर पोषण असलेले अर्ज करू शकतात. कुटुंबातील कुणाकडेही कृषीयोग्य जमीन नसावी.
कुटुंब प्रमुखाकडे निवासी जमीन असेल तर लाभ घेता येईल.
कुठे करावा अर्ज?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://rggbkmny.cg.nic.in/ वर जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.