धक्कादायक ! लग्न जुळत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लग्न जुळत नसल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बेलतरोडी येथे उघडकिस आला आहे. आत्महत्येपुर्वी तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत आई वडीलांची माफी मागत भावनिक संदेश लिहीला आहे.

रश्मी विजय दुरणे (वय ३९, मनीषनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

रश्मी यांना योग्य वर मिळत नसल्याने वय चाळीशीच्या आसपास गेले. त्याची खंत तिला बोचत होती. रश्मीचं लग्न न झाल्याने तिच्या दोन्ही भावंडांची लग्नं खोळंबली होती. बहिणीच्या लग्नापुर्वी लग्न न करण्याचा पवित्रा भावांनी घेतला होता. भांवंडाची लग्न व्हावी अशी इच्छा असल्याने त्या नैराश्यात होत्या. दरम्यान बुधवारी तिचे कुटुंबिय नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी  रश्मीने बाहेरचे दार लावले आणि फॅनला गळफास घेतला. सायंकाळी घरी आलेल्या आईने तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. तेव्हा त्यांचा आरडाओऱडा ऐकून शेजारी जमा झाले. बेलतरोजी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, तिने आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात तिने लग्न जुळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आई बाबा सॉरी असं म्हणत मम्मी लव्ह यू असा भावनिक मजकूर त्यात आहे.