प्रेयसीनं लग्नास दिला नकार, त्यानं चक्क अडीच कोटींचं घर विकलं कवडीमोलानं, नंतर बनला लुटारू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भिलाई, दुर्ग आणि रायपूरमध्ये ५० हून अधिक लूटपाट करणाऱ्या अटट्ल चोराला येथील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे. आरोपी अभिषेक जोशीच्या दोन महिन्यांपासून पोलिसांची टीम मागावर होती. त्या स्वतःचं घर नसल्यानं तो पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याने १७ गुन्ह्यांची कबुली पोलिस चौकशी दरम्यान दिली. तसेच आरोपीने विकलेले एक डझन फोन ताब्यात घेण्यात आले आहेत.

आरोपी अभिषेक जोशी याने चौकशी दरम्यान पोलिसांना दिलेली माहिती अशी, की कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची मैत्री एका मुलीसोबत झाली होती. दोन्ही एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांना लग्नही करायचे होते. मात्र, त्याच्या आई-वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर प्रेयसीनेही त्याला लग्नास नकार दिला. तसेच तीने घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केले. प्रेय़सीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर त्याने अडीज कोटींचा बंगला केवळ १४ लाखांना विकला. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळला. प्रेयसीवरचा राग आणि बदला तो महिला आणि मुलींना लूटून घेत होता. त्याने आतापर्यंत वर्षभरात असे ५० प्रकार केले. यानंतर तो अट्टल लुटेरा बनला होता. भिलाईमध्ये आरोपीने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीला चाकू मारून लुटालूट केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला पकडण्य़ासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते. फुटेजमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे वेगळ्याच अशा लाल रंगाची कार होती. पोलिसांनी रायपूरचे देवेंद्र नगर, त्याचे येण्या-जाण्याची ठिकाणे, कुम्हारी टोल प्लाझासह अनेक ठिकाणी चौकशी केली. आरोपीने ऑक्टोबरच्या महिन्यात सुपेला, भिलाईनगरसह अन्य राज्यांमध्ये गुन्हे केले होते.

पोलिसांना आरोपीची माहिती मिळताच रायपूरच्या हॉटेल संचालकाशी संपर्क केला. हॉटेल स्टाफ बनून पोलीस तिथे पोचले. त्या हॉटेलची प्रत्येक खोली चेक केली. ग्राहकांची चौकशी केली. जेव्हा पोलीस आरोपीच्या दरवाजावर पोहोचले तेव्हा त्यांनी त्याच्याकडे आयकार्ड मागितले. आरोपीने दरवाजा उघडताच पोलिसांनी त्याला पकडले. यानंतर त्याने केलेल्या चोऱ्यांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.