बाईक बिघडल्यामुळे मुलींनी मागितली मदत, मदतीसाठी आलेल्या 11 जणांनी केला बलात्कार 

रांची : वृत्तसंस्था
गाडी बिघडल्यामुळे दोन मुलींनी मदतीसाठी मित्राला फोन केला. यानंतर मित्राने त्याच्या काही मित्रांना मदतीसाठी पाठवले. मात्र मदतीसाठी आलेल्या 11 तरुणांनी दोन मुलींवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील लोहरदगा भागात घडली आहे. या घटनेमुळे राजधानी रांचीत प्रचंड खळबळ उडाली आहे. 16 आॅगस्ट रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी 11 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
[amazon_link asins=’B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9660552a-a473-11e8-bad7-099094821304′]
याबाबात सविस्तर वृत्त असे की, रात्री दोन अल्पवयीन मुली बाईक घेऊन फेरफटका मारायला निघाल्या. त्यांची मोटारसायकल अचानक रस्यामध्ये  बंद पडली. त्यामुळे मुलींनी त्यांच्या मित्राला फोन करून मदत मागितली. त्या मित्राने त्याच्या मित्रांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी अकरा जण तिथे पोहोचले त्यांनी या दोन मुलींना निर्जन स्थळी नेले आणि बलात्कार केला. आरोपींनी मुलींजवळ असलेला फोनही हिसकावून घेतला.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b99eaf9-a473-11e8-ae85-3b19db17161b’]

17 ऑगस्टला मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीसांनी टास्कफोर्स तयार केला आणि सर्व 11 आरोपींना जेरबंद केलं. त्यांच्याजवळून तो फोनही हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळवलं. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या घटनेची दखल घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

इतर बातम्या