आळंदी म्हातोबा येथे वीज कोळसली, 13 बकर्‍या दगावल्या तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – हस्त नक्षत्राच्या मुसळधार पावसासोबतच विज कोसळल्याने आळंदी म्हातोबा येथील शिवाजी टकले यांच्या 13 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यामुळे या शेतकर्याचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

आज शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील पूर्व भागातील बहुतेक गावात जोरदार पाऊस पडला याचवेळी आळंदी म्हातोबा येथील रामवाडी परिसरात असलेले शिवाजी विलास टकले हे डोंगरात बकऱ्या चारत होते. अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे काहीच सुचेना त्यावेळी एका झाडाचा आश्रय घेतला असता एक विज तेथे कोसळली आणि त्यांच्या कळपातील तेरा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे या शेतकर्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर त्यांनी दिलीप वाल्हेकर यांना याची कल्पना दिली. त्यानंतर वाल्हेकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीराम भोसले यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

नुकतेच या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते त्यातून कुठ सावरत असताना पुन्हा आज मुसळधार पाऊस व विजांच्या कडकटाने परिसरात पुरपरिस्थिती निर्माण केल्याचे चित्र आहे.