नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भावामुळे यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, यावर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होणार नाही. वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट कमी होणार आहे. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले कि, यावर्षी सोन्याच्या विक्रीच्या दरात 50 टक्क्यांनी घट होणार आहे.
अधिक बोलताना त्यांनी सांगितले कि, धनत्रयोदशीला जवळपास 40 टन सोन्याची विक्री होत असते. मात्र यावर्षी मागणी नसल्याने यामध्ये मोठ्या प्राणावर घट होणार आहे. आयात शुल्कमध्ये देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वाढीमुळे देखील सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 26 टन सोने आयात केले गेले असून मागील वर्षी 81 टन सोने आयात केले गेले होते. केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्क 10 टक्क्यांवरून साडेबारा टक्के करण्यात आल्याने सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
दरम्यान, मेहता यांनी सांगितले कि, भारतात तीन प्रकारच्या काळात सोन्याची मागणी असते. लग्नाच्या वेळी, सणासुदीच्या काळात आणि रेग्युलर डिमांड, अशा तीन कार्यकाळात सोन्याला मागणी असते. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात देखील सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे मेहता यांनी सांगितले.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर